उपक्रम : जिल्हयातील मंडळ स्तरावर प्रगतशील शेतक-यांची Resource Bank तयार करुन इतर शेतक-यांना प्रभावीपणे मार्गदर्शन करणे.
ता.करवीर येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत कृषी रथाद्वारे खरीपपूर्व मार्गदर्शन संपन्न दिनांक २९, ३० व ३१ मे २०२५
कृषी विभाग(आत्मा) 29 May 2025
केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालय, यांच्या वतीने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियान कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने करवीर तालुक्यात राबवण्यात आले.
या वेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षणात बीज प्रक्रिया, लागवड, कीड व रोग नियंत्रण, 'आत्मा'मार्फत शेतकरी गट स्थापन करणे, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जैविक निविष्ठा तयार करणे व इतर शासनाच्या योजना याबाबत माहिती देण्यात आली.
कणेरी, कोगील बुद्रुक, दर्याचे वडगाव, गिरगाव, कंदलगाव, हलसवडे, नंदगाव, हळदी, परिते, क. बीड, गणेशवाडी, शिरोली दुमाला, पाडळी खुर्द, कोगे, सांगरुळ, बोलोली, म्हालसवडे, घानवडे या
गावात कृषी रथाच्या माध्यमातून मार्गदर्शन झाले.
'आत्मा'चे सुंदरम माने, निखिल कुलकर्णी, डॉ. नरेंद्र गजबिये, डॉ. प्रशांत गवर, डॉ. राहुल यादव, डॉ. विद्यासागर गेडम, डॉ. रवींद्र सिंह, करवीरचे तालुका कृषी अधिकारी करवीर युवराज पाटील, कृषी पर्यवेक्षक सुनील रेपे, कणेरी कृषी विज्ञान केंद्राचे पांडुरंग काळे, राजेंद्र वावरे, डॉ. सुनील कुमार, डॉ. पुष्पनाथ चौगले आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.