16
Jul 25
मुख्यमंत्री प्रतिमान प्रशासन अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून माध्यमिक शिक्षण विभागात राबवण्यात येत असलेल्या संस्कार शिबिरास जिल्ह्यातील शाळांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली. जिल्ह्यातील दीडशे शाळातून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाकडून वर्षभराच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी प्रत्येक तालुक्यामधून दहा शाळा निवडण्यात आलेल्या आहेत. हळूहळू जिल्ह्यातील सर्व शाळांमधून हा उपक्रम सुरू होणार आहे जुलै महिन्यात या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांनी विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये व्यवसायांना क्षेत्रभेटी व व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर संस्कार शिबिर घेण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटीचा आनंद घेतला. या उपक्रमांतर्गत आठवी ते बारावीचे सुमारे ४१ हजार ७९० विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट केली. या अंतर्गत इव्हेंट मॅनेजमेंट ,शेती, दुग्ध व्यवसाय, बेकरी व्यवसाय, फॅब्रिकेटर्स, कारखाना अशा विविध व्यवसायांना प्रत्यक्ष भेट दिली.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा मूल्य रुजवण्याकरिता त्या व्यवसाय निर्मितीचा अनुभव देण्यात आला.सध्या नोकरीपेक्षा व्यवसायातील संधी उपलब्ध आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले. नोकरी हे केवळ ध्येय न मानता व्यवसायभिमुख मूल्य रुजवण्यासाठी व्यवसायिकांना येणारे अनुभव व त्यांच्या उद्योगातील अडचणी याबाबत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली प्रतिक्रिया २) आजची पिढी मोबाईलचा अतिरेकामुळे व्यसनाधीनतेकडे व अन्य वाईट मार्गाकडे वळली आहे. मुलांच्या मध्ये या वयात संस्काराची खूप गरज आहे. या संस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी संस्कार मूल्ये रुजण्यात मदत होईल. आर. वाय. पाटील. सचिव, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर. प्रतिक्रिया संस्कार शिबिरामुळे मुलांच्या डोक्यावरील अभ्यासाचा ताण कमी होण्यास मदत झाली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य रुजवल्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. शासनाचा हा उपक्रम आजच्या पिढीसाठी खूपच उपयुक्त आहे. संतोष ठाकर पालक प्रतिक्रिया संस्कार शिबिरामुळे शनिवार केव्हा येतो, याची उत्कंठा लागून राहिली आहे. या दिवशी आमच्या कलागुणांना संधी देणारे तसेच आमच्या अंगी चांगली मूल्ये रुजवण्यासाठी उपयुक्त अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे शनिवार आमच्यासाठी एक उत्सव बनला आहे . समर्थ पाटील विद्यार्थी संकल्प माध्यमिक विद्यालय.