1
May 25
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील सर्व मंजूर कामे पूर्ण करणे. योजनेतील लाभार्थींना सिंचन विहिर करिता वीज जोडणी उपलब्ध करून देणे.

सन 2023-24 मधील 2 लाभार्थी व सन 2024-25 मधील 25 लाभार्थी असे एकूण 27 लाभार्थींना महावितरण कार्यालयाकडून वीज जोडणी कोटेशन मंजूर करणेत आलेले नाही.त्यामुळे सन 2023-24 मधील वीज जोडणी आकार-2 व पंपसंच -2 असे एकूण 4 लाभार्थी व सन 2024-25 मधील वीज जोडणी आकार -25 व पंपसंच -25 लाभार्थी असे एकूण 50 लाभार्थींना लाभ देता येत नाही.सदर कार्याक्रमांतर्गत निर्धारित केलेल्या उदिष्टमध्ये वीज जोडणी आकार -27 व पंपसंच -27 असे एकूण 54 कामे अपूर्ण राहणार आहेत.5 लाभार्थ्यानी पंपसंच मागणी केली आहे.त्यांच्याकडे वीज कनेक्शन आहे.त्यामुळे ते पंपसंच खरेदी करणार आहेत.तसेच नवीन विहीर 36 पैकी 31 कामे सुरू असून लाभार्थींच्या आर्थिक अडचणीमुळे 5 विहीरींची कामे सुरू झालेली नाहीत.कोल्हापूर जिल्हयात माहे जुलै व ऑगस्ट महिन्यात खूप प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे सदर 5 विहीरींची कामे माहे 15 ऑगस्ट 2025 अखेर पूर्ण होणार नाहीत.

अधिक माहिती...