5
Jun 25
आत्मा अंतर्गत बहिरेश्वर, ता. करवीर येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्डॉगत प्रशिक्षण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न..

दिनांक 05/06/2025 रोजी बहिरेश्वर ता. करवीर येथे नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत 200 शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात शेतामध्ये रासायनिक खतांचा अतिवापर तसेच पाण्याचा अतिवापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे व शेत जमीन क्षारपड होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच किटकांनाशकांचा जास्त वापरामुळे शेतकऱ्यांच्या बरोबर जनसामान्य मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतं आहे. याकरिता आत्मा योजनेतून करवीर तालुक्यात 50 हेक्टरचे 20 गट स्थापन करून 1000 हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक(सेंद्रिय) शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत करण्याचे काम आत्मा विभागा मार्फत करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात श्री तानाजी निकम, प्रगतशील शेतकरी व तज्ञ मार्गदर्शक, श्री सिद्धगिरी कणेरी मठ यांच्याकडून शेतकऱ्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवला जाऊ शकतो शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरच जैविक निविष्ठा निर्मिती करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शनात सविस्तर सांगण्यात आले. मा. प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती रक्षा शिंदे यांनी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती हि काळाची गरज असल्याचे सांगत पुढच्या पिढीसाठी जमिनी वाचवायचा असतील तर सेंद्रिय शेती करणे खूप गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत लाभार्थी शेतकरी गटाना शेतावर निविष्ठा निर्मिती करण्यासाठी प्रोहात्सानपर अनुदान वाटप करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमात श्री आदित्य मांगले यांनी पुढील काही दिवसात शेतकऱ्यांनी AI टेक्नॉलॉजी खुप महत्त्वाची भूमिका बजावणार असून त्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादन वाढ करणे बाबत मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात बहिरेश्वर,गणेशवाडी, आमशी, तेरसवाडी तर्फे कदमवाडी या गावातील नैसर्गिक शेती गटाचे सदस्य उपस्थीत होते.या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा करवीरचे श्री सुंदरम माने व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री निखिल कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती श्री राजेंद्र सूर्यवंशी माजी सभापती करवीर, बहिरेश्वर सरपंच सौ. वंदना दिंडे, शिरोली दु सरपंच श्री सचिन पाटील तसेच शाहू सेंद्रीय शेतकरी गटांचे अध्यक्ष ज्ञानदेव बचाटे, सचिव श्री. रामचंद्र वरुटे, श्री.निवृत्ती दिंडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थीत होते.

अधिक माहिती...
2
Jun 25
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान २०२५- किसरूळ, तालुका पन्हाळा येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम संपन्न..

'मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान २०२५' अंतर्गत आत्मा व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने किसरूळ येथे पौष्टिक तृणधान्यांवर आधारित माहिती व प्रशिक्षणाचा कार्यक्रम झाला. नाचणीव्यतिरिक्त वरी, राळा, सावा, बार्टी, कोद्रा या लघु तृणधान्य पिकांच्या लागवडीबाबत सर्जेराव पाटील, प्रगतिशील शेतकरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुनील कराड यांनी वरी, राळा, कोद्रा इत्यादी पिकांची योग्य जमीन निवड, पेरणीचे अंतर, रासायनिक खतांचे प्रमाण आदी तांत्रिक बाबींचे सविस्तर मार्गदर्शन कार्यक्रमाचे नियोजन आत्मा विभागाचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री आर. एस. चौगुले व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजित पाटील, किशोर कुंभार, प्रगतिशील शेतकरी कृष्णात पाटील, प्रगतिशील शेतकरी यांनी केले. आभार एम. डी. पाटील यांनी मानले. सरपंच विमल डेगळे, सुरेश पाटील, अजित रामाने, सागर पाटील, केशव मुगडे, शिवराम पाटील (किसरूळ) आदी उपस्थित होते.

अधिक माहिती...
31
May 25
पीळनी , ता चंदगड येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न

पीळनी , ता चंदगड येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न झाले असून तालूक्यातील प्रगतशील शेतकरी मारुती गावडे यांनी उपस्थितांना भात बीज प्रक्रिया, हुमनी नियंत्रण, प्रकाश सापळा तयार करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकरी -२९

अधिक माहिती...
29
May 25
ता.करवीर येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत कृषी रथाद्वारे खरीपपूर्व मार्गदर्शन संपन्न दिनांक २९, ३० व ३१ मे २०२५

केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालय, यांच्या वतीने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने विकसित कृषी संकल्प अभियान कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने करवीर तालुक्यात राबवण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व प्रशिक्षणात बीज प्रक्रिया, लागवड, कीड व रोग नियंत्रण, 'आत्मा'मार्फत शेतकरी गट स्थापन करणे, राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जैविक निविष्ठा तयार करणे व इतर शासनाच्या योजना याबाबत माहिती देण्यात आली. कणेरी, कोगील बुद्रुक, दर्याचे वडगाव, गिरगाव, कंदलगाव, हलसवडे, नंदगाव, हळदी, परिते, क. बीड, गणेशवाडी, शिरोली दुमाला, पाडळी खुर्द, कोगे, सांगरुळ, बोलोली, म्हालसवडे, घानवडे या गावात कृषी रथाच्या माध्यमातून मार्गदर्शन झाले. 'आत्मा'चे सुंदरम माने, निखिल कुलकर्णी, डॉ. नरेंद्र गजबिये, डॉ. प्रशांत गवर, डॉ. राहुल यादव, डॉ. विद्यासागर गेडम, डॉ. रवींद्र सिंह, करवीरचे तालुका कृषी अधिकारी करवीर युवराज पाटील, कृषी पर्यवेक्षक सुनील रेपे, कणेरी कृषी विज्ञान केंद्राचे पांडुरंग काळे, राजेंद्र वावरे, डॉ. सुनील कुमार, डॉ. पुष्पनाथ चौगले आदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अधिक माहिती...
29
May 25
चनवाड, तालुका शाहुवाडी येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत सेंद्रिय शेती – काळाची गरज प्रशिक्षण संपन्न

श्री.विठ्ठल पाटील , रिसोर्से फार्मर, शाहुवाडी यांनी सेंद्रिय पद्धतीने इंद्रायणी भात लागवड तंत्रज्ञान विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली.तसेच विविध शासकीय योजना व खरीप हंगामाच्या दृष्टीने विविध पिक लागवड पद्धती याविषयी माहिती दिली.

अधिक माहिती...
27
May 25
मसोली (ता. आजरा) येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण संपन्न

मसोली (ता. आजरा) येथे मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर यांच्या वतीने खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सरपंच चंद्रकांत गुरव अध्यक्षस्थानी होते. कृषी सेवक वैभव जौंदाळ यांनी स्वागत केले. यावेळी शेतकऱ्यांना भात लागवड तंत्रज्ञान बाबत रिसोर्स फार्मरचे सूर्यकांत दोरूगडे यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये मिठाच्या द्रावणातील बीजप्रक्रिया, जैविक निविष्ठा अझोटोबॅक्टर) याचा वापर करून बीजप्रक्रिया करण्याचीच पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच सुरेश होडगे, कृषी सेवक संकेत पाटील, स्वामिनी दातीर, शिवाजी ढोकरे, ज्ञानदेव तेजम, दीपाली गुरव, तुकाराम पोवार, भागोजी कांबळे आदी शेतकरी उपस्थित होते.

अधिक माहिती...
27
May 25
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आजरा तालुक्यातील मौजे किणे येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

आत्मा अंतर्गत जिल्ह्यासाठी राबवण्यात येणारे १०० दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रमांतर्गत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने आजरा तालुक्यातील मौजे किणे येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन २६ मे २०२५ रोजी केले होते. या प्रशिक्षणाला परिसरातील शेतकरी उपस्थित होते. प्रशिक्षणात भात लागवड तंत्रज्ञानाबाबत सोहाळे येथील रिसोर्स फार्मर सूर्यकांत दोरुगडे, किणेचे कृषीसेवक संकेत पाटील, आजरा कृषीसेवक वैभव जौंदाळ, आजराचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर यांनी मार्गदर्शन केले. भात बीजप्रक्रियेबाबत प्रात्यक्षिक दाखवले. यात सहभागी शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा त्यांना खरीप हंगामात निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यमगेकर यांनी मान्यवर, शेतकरी आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्यांचे आभार मानले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत अनेकांनी प्रशिक्षणानंतर व्यक्त केले.

अधिक माहिती...
25
May 25
इनाम सावर्डे , ता चंदगड येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न

इनाम सावर्डे , ता चंदगड येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न झाले असून तालूक्यातील प्रगतशील शेतकरी सुनील पाष्टे, इनाम सावर्डे यांनी उपस्थितांना भात बीज प्रक्रिया, हुमनी नियंत्रण, प्रकाश सापळा तयार करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकरी - 52

अधिक माहिती...
24
May 25
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत दिनांक 24 मे 2025 रोजी आत्मा यंत्रणा, कृषि विभाग अंतर्गत गुडाळ, तालुका राधानगरी येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न....

आत्मा यंत्रणा, कृषि विभाग अंतर्गत गुडाळ, तालुका राधानगरी येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर सो,मंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री, जिल्हा कोल्हापूर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात देशी गायीच्या पूजनाने झाली. कार्यक्रमात आत्मा विभागाने सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याबाबत प्रात्याक्षिक आयोजित केले होते. हुमणी कीड व्यवस्थापन मोहिमाविषयी प्रात्याक्षिक द्वारे उपस्थितांना माहिती देण्यात आली. जिल्ह्यातून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. कार्यक्रम दरम्यान सेंद्रिय शेतीमध्ये चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आत्मा योजनेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान विषयी माहिती मिळत असलेबाबत शेतकऱ्यांनी माहिती दिली व आत्मा विभागाचे आभार मानले. कार्यक्रमामध्ये सुमारे दीड हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत सहभागी लाभार्थ्यांना मा.पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते प्रोत्साहन पर अनुदान अंतर्गत लाभ देण्यात आला. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी मा. पालकमंत्र्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थित राहून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते, जमिनीची सुपीकता वाढते आणि ग्राहकांना विषमुक्त अन्न मिळते. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणेबाबत मा.पालकमंत्री यांनी सांगितले. आत्मा अंतर्गत आयोजित प्रशिक्षणामुळे निश्चित शेतकऱ्यांना फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रम आयोजना करिता सहभागी श्री संग्राम पाटील, अद्यक्ष, गुडाळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या कामाची प्रशंसा केली. श्रीमती रक्षा शिंदे, प्रकल्प संचालक, आत्मा यांनी या प्रशिक्षणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना शाश्वत शेती पद्धती स्वीकारण्यास मदत होईल असे सांगितले तसेच आत्मा विभाग अधिनस्त तालुक्यातील कार्यरत बी.टी.एम व ए.टी.एम यांच्या सहय्याने आत्मा योजना विषयक सुरु असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास आवाहन केले. श्री. शांतिकुमार पाटील व श्री ऋतुराज चव्हाण यां तज्ञ मार्गदर्शकांनी सेंद्रिय शेतीचे विविध पैलू आणि तंत्रज्ञान यावर उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये ऊस पाचट, माती परीक्षण महत्व, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, हिरवळीचे खत फायदे, नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकांवरील कीड व रोगांचे नियंत्रण कसे करायचे, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रक्षा शिंदे, प्रकल्प संचालक, आत्मा, श्री.पांगरे , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व श्री अरुण भिंगारदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी व आत्मा व कृषि विभागाचे अधिकारी कार्मचारी उपस्थित होते. शेवटी श्री.पराग परीट, बी टी एम गगनबावडा यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, अधिकारी , कर्मचारी व शेतकरी यांचे आभर मानले .

अधिक माहिती...
23
May 25
दुंडगे, ता चंदगड येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न

दुंडगे, ता चंदगड येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत खरीप हंगामपूर्व कार्यशाळा संपन्न झाले असून तालूक्यातील प्रगतशील शेतकरी उत्तम पाटील दुंडगे यांनी उपस्थितांना भात बीज प्रक्रिया, हुमनी नियंत्रण, प्रकाश सापळा तयार करणे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अधिक माहिती...
21
May 25
मौजे हसूरचंपू , ता गडहिंग्लज येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी तपासणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक

दिनांक 21/05/2025 रोजी मौजे हसूरचंपू , ता गडहिंग्लज येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी तपासणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक रून दाखवण्यात आले तसेच भात पिकातील बीज प्रक्रिया व लागवड तंत्रज्ञान बाबत श्री रामचंद्र टेळे प्रगतशील शेतकरी यांनी मार्गदर्शन केले

अधिक माहिती...
19
May 25
दाभिल (ता. आजरा) येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उत्पादन वाढीसाठी बीज प्रक्रिया बाबत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण

भाताची लागवड चारसूत्री, श्रीपद्धतीने करावी. बीज प्रक्रिया केल्यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. त्यामुळे भाताच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, अशी माहिती रिसोर्स फार्मर सूर्यकांत दोरुगडे यांनी दिली. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर यांच्या वतीने दाभिल (ता. आजरा) येथे खरीप हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम झाला. सरपंच युवराज पाटील अध्यक्षस्थानी होते. मिठाच्या पाण्यातील बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना दाखवले. श्री. दोरुगडे यांनी भात लागवड तंत्रज्ञानबाबत मार्गदर्शन केले. जमीन चांगल्या पद्धतीने तयार करावी. शेणखत, हिरवळीची व कंपोष्ट खतांचा वापर केल्यामुळे भाताचे उत्पादन वाढते. तसेच भाताच्या सुगंध व चवीत फरक पडतो. चार सूत्री, श्री पद्धतीने भात लागवड याबाबतही माहीती दिली. दाभिलचे कृषी सेवक नागेश काळे, नामदेव पाटील, कमलाकर पाटील, नम्रता नार्वेकर, इजाबेल बार्देस्कर, उज्वला कांबळे व शेतकरी उपस्थित होते. आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक अमित यमगेकर यांनी स्वागत केले

अधिक माहिती...
16
May 25
हनिमनाळ , ता गडहिंग्लज येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, बिजप्रक्रिया बाबत प्रशिक्षण संपन्न.

दिनांक 16/05/2025 रोजी हनीमनाळ येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी तपासणी व बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले तसेच भात पिकातील बीज प्रक्रिया व लागवड तंत्रज्ञान बाबत श्री चेतन बळवंत मैद प्रगतशील शेतकरी यांनी मार्गदर्शन केले

अधिक माहिती...
16
May 25
गणेशवाडी, ता.करवीर येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत हुमणी नियंत्रण प्रात्यक्षिक संपन्न

गणेशवाडी (ता. करवीर) येथे कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानअंतर्गत शेतकऱ्यांना जैविक पद्धतीने हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्याचे प्रात्यक्षिक दाखविले. 'आत्मा'चे सुंदरम माने व निखिल कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांना हुमणी कीड शेतात कशी निर्माण होते. याचा जीवनक्रम सांगितला. हुमणी नियंत्रणाचे महत्त्व किती महत्त्वाचे आहे व हुमणी किडीमुळे होणारे पिकाचे नुकसान याची माहिती शेतकऱ्यांना दिली. येथील भावेश्वरी नैसर्गिक शेतकरी गटातील शेतकरी अमर माने यांचे प्रक्षेत्रावर हे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी शेतकरी राणोजी माने, बंडा माने, प्रकाश माने, दत्तात्रय माने, पिंटू मेढे, नामदेव दौंडकर आदी उपस्थित होते. आत्मा करवीरचे श्री सुंदरम माने व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री निखिल कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

अधिक माहिती...
15
May 25
थावडे, ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत 'हुमणी' नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांच्या वापराबाबत मार्गदर्शन..

मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत मौजे थावडे (ता. शाहूवाडी) येथे ऊस पीक व्यवस्थापन तसेच मधमाशीपालनाबाबत शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पळसवडे येथील प्रयोगशील शेतकरी मारुती पाटील यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवड आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. या वेळी कृषी सहायक ओंकार पालवे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, भात बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक आणि माहिती दिली. साहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन कांबळे यांनी आत्मा यंत्रणेमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, सेंद्रिय शेती तसेच 'हुमणी' नियंत्रणासाठी प्रकाश सापळे कसे तयार करावेत आणि नियंत्रणाच्या उपाययोजनांवावत मार्गदर्शन केले. या वेळी सरपंच शोभा मराठे, उपसरपंच नानुबाई पाटील, ग्रामसेवक एन. टी. कोळी तसेच ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी आणि बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अधिक माहिती...
14
May 25
मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्कोगत डोली ता. पन्हाळा येथे खरीप हंगाम पूर्व कार्यक्रम संपन्न

आत्मा व कृषी विभागाच्या वतीने कोडोली ता. पन्हाळा येथे चिकुर्डे रोडवरील रामकृष्ण फार्महाउस सभागृहात खरीप हंगाम पूर्व आढावा समेत डॉ. जयवंत जगताप, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख KVK, तळसंदे यांनी मार्गदर्शन केले. श्री.किशोर कुंभार, श्रीमती मंजुळा महेश देशमुख, श्री जयवंत मगदूम यांनी उपस्थितांना विविध पिकांबाबत - खरीप हंगाप पूर्व नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. खरीप पिकासाठी भात, भुईम गहु, ज्वारी, सोयाबीन यासह अन्य वाणाचे पुर्वीचे बियाणे, नवीन संशोधन केलेल्या वाणाचे बियाणे पिक हंगामाचा कालावधी, एकरी उत्पादन नैसर्गिक व रासायनिक बीज प्रक्रिया केल्याने होणारे किड नियंत्रण, पिकनिहाय किडीचे प्रमाण त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी करावी लागणारी किटकनाशकांची फवारणी, नैसर्गिक व रासायनिक खतांची द्यावी लागणारी मात्रा तसेच ऊसाच्या शेतात खरीपातील आंतरपीक कसे घ्यावे असे सविस्तर मार्गदर्शन डॉ. जगताप यांनी करून शेतकन्यांना उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समर्पक उत्तर दिले. पन्हाळा तालुका कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. शरद शिंदे यांनी तालुक्यात खरीप हंगामातील संभाव्य पीक पेरणीचे नियोजन केल्याचे सांगितले, सभाध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी पोपटराव पाटील यांनी खरीपाच्या पेरणीसाठी बियाणांची तसेच खतांची उपलब्धता, शासन योजनेत शेतकऱ्यांना मिळणारे लाभयाची माहिती दिली. श्रीमती मंजुळा देशमुख, किसरुळचे कृषीभूषण शेतकरी सर्जे राव पाटील, प्रगतशील शेतकरी जयवंत मगदूम केखले, अशोक भोसले, हरिष पाटील कोडोली, कळे मंडल कृषी अधिकारी टी. एन. खोत, आत्मा चे राजेंद्र चौगले, विश्वजीत पाटील, विश्वास राबाडे, जोतिराम सुर्यवंशी, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, शेतकरी मोठ्या संखेने सभेस उपस्थित होते. पन्हाळा मंडल कृषी अधिकारी तानाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कोडोलीचे कृषी सहाय्यक ने सुजय भंडारी यांनी आभार मानले

अधिक माहिती...
9
May 25
गडहिंग्लज येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच सोयाबीन उगवण क्षमता तपासणी, बिजप्रक्रिया, भात लागवड बाबत प्रशिक्षण

खरीप हंगामातील पीकनिहाय क्षेत्र व आवश्यक असणाऱ्या खतांची माहिती दिली. कृषी संशोधन केंद्रातील सहयोगी प्राध्यापक श्री. दलाल यांनी खरीप हंगामपूर्व मशागत, भाजीपाला व फळबाग लागवडीची, कृषी पर्यवेक्षक अरुण खोत यांनी कृषी विभागाच्या योजनांची, कृषी पर्यवेक्षक किरण मोर्ती यांनी गावस्तरावर राबविल्या जाणाऱ्या शेतीशाळांची माहिती दिली. तालुकास्तरीय पीक स्पर्धेतील विजेते मल्लिकार्जुन बेळीबारी (जिल्हास्तरावर प्रथम), प्रशांत कुरणे (तालुकास्तर प्रथम), प्रकाश देसाई (व्दितीय), वसंत नाईक (तृतीय), राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेतील विजेते सूर्यकांत देसाई यांना सन्मानित करण्यात आले. कृषी अधिकारी सुधाकर खोराटे, धन्वंतरी देसाई यांच्यासह प्रगतशील शेतकरी, कृषी सेवा केंद्रांचे चालक उपस्थित होते. कृषिसेवक श्वेता वाळुंज यांनी सूत्रसंचालन केले. कृषी सहायक अनिल कांबळे यांनी आभार मानले.

अधिक माहिती...
5
May 25
ता.आजरा येथे मा.मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान कोल्हापूर अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आत्मा विभाग व कृषी विभाग ने नियोजन केले आहे कृषी विभागाकडून बी-बियाणे, खते यांसह विविध गोष्टींची आवश्यक तयारी केली आहे, अशी माहिती मंडल कृषी अधिकारी पी. जी. पाटील यांनी दिली. येथील मध्यवर्ती प्रशासकीय सभागृहात तालुका कृषी अधिकारी कार्यालय आजरा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर यांच्यातर्फे खरीप हंगामपूर्व शेतकरी कार्यशाळा झाली. तहसीलदार समीर माने अध्यक्षस्थानी होते. आत्मा अंतर्गत सेंद्रिय व नैसर्गिक शेतीची माहिती सदर कार्यशाळेत देण्यात आली. आजरा तालुक्यातील हवामान पाऊस व जमीन बांबू पिकासाठी पोषक आहे. पडीक जमिनीत बांबूची लागवड होऊ शकते. यातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती साधता येईल. तापमानवाढीच्या काळात बांबू पर्यावरणीदृष्ट्या महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे, असे आवाहन भूमी शेतकरी उत्पादक गट चिमणेचे अध्यक्ष वसंतराव तारळेकर, प्रगतशील शेतकरी यांनी केले.

अधिक माहिती...