"महाराष्ट्रातील क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा 13 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये लोक कल्याणकारी शासनाची संकल्पना प्रत्यक्षात आणणेसाठी प्रभावीपणे राबविणेत येत आहे. या अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अतिशय चांगले योगदान दिले आहे हे प्रशंसनीय आहे.
याच प्रेरणेतून मा.ना.प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्हयातील नागरिकांसाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान या नावाने कृती कार्यक्रम राबविणेचे निश्चित करण्यात आलेले आहे. सदर अभियानामध्ये जिल्हयातील सर्व शासकीय यंत्रणांनी सकारात्मकतेने व प्रथम प्राथम्याने सहभागी होऊन अभियान यशस्वी करणेसाठी आपला सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन आम्ही करतो."
|
श्री. देवेंद्रजी फडणवीस
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
|